Ticker

10/recent/ticker-posts

नास्ता करा, आजार पळवा

नास्ता करा, आजार पळवा

-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)

शाळेत, कॉलेजला जाणारी मुले क्लासमध्ये लेक्चर चालू असताना झोपेची डुलकी का घेतात? अभ्यासात त्यांचं लक्ष का लागत नाही? ऑफिसला जाणाऱ्या मंडळींना सकाळी सकाळी जांभई का येते? त्यांना स्फूर्ती का नसते? घरातील काम करणाऱ्या गृहिणी दुपार होताच का थकून जातात? आपल्यातील बऱ्याच जणांचा असा अनुभव आहे ना..? त्याचं एकमात्र कारण म्हणजे सकाळचा नास्ता न करणे.


खरेतर संतुलित आहारात नाश्त्याची भूमिका ही महत्त्वपूर्ण आहे. संपूर्ण रात्रभर व्यक्तीचं शरीर तथा मेंदू १० ते १२ तास कुठल्याही आहारापासून वंचित असते. आपले शरीर हे एखाद्या कारप्रमाणे असते. जोपर्यंत कारला पेट्रोल, डिझेल, गॅस मिळत नाही तोपर्यंत तिला आपण चालवू शकत नाही. त्याचप्रमाणे शरीरालाही चालवायला, दिवसातील विविध कार्य संपन्न करण्यासाठी शक्तीची गरज असते. जी आपल्याला सकाळी नास्ता (ब्रेकफास्ट) करण्याने मिळते. आपले पूर्वजदेखील या गोष्टीवर जोर देत होते आणि दररोज वेळ काढून नाश्ता करत होते. ज्यामुळे संपूर्ण दिवसभराची मेहनत ते न थकता करत होते. 


सध्याच्या धकाधकीच्या जमान्यात रात्री झोपण्यास उशीर होतो. परिणामी, सकाळी उठायला उशीर होतो. सकाळी वेळेची मारामारी. त्यामुळे सकाळी महत्त्वाची गोष्ट म्हणजे नाश्त्याला जराही महत्त्व दिलं जात नाही. त्यामुळे दिवसभर आळस, सुस्ती वगैरे येते. या समस्यांपासून वाचण्यासाठी सकाळी नाश्ता करणे गरजेचे आहे. कारण शरीर आणि मेंदूला सगळ्यात प्रथम ग्लुकोज देणारा, त्याला सजक ठेवणारा नाष्टा हाच महत्त्वाचा खुराक आहे.

 नाश्ता (ब्रेकफास्ट) केल्यामुळे होणारे फायदे:-
संशोधनादरम्यान असे सांगण्यात येते की, जे व्यक्ती दररोज सकाळी नास्ता करतात ते लोक दिवसभर तंदुरुस्त राहतात. 

लहान मुलांची बुद्धी आणि स्मरणशक्ती तसेच क्लासमध्ये शिकण्याची इच्छा सकाळी योग्य नास्ता केल्याने वाढते.
सकाळी नाश्ता (ब्रेकफास्ट) केल्याने भूक कमी लागते आणि एकदम भरपेट खाण्याची इच्छा कमी होते. 


नास्ता (ब्रेकफास्ट) न केल्याने होणारे नुकसान:-
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार नास्ता (ब्रेकफास्ट) न केल्याने हृदयरोग, स्थूलता, शारीरिक शक्ती तसेच स्मरणशक्तीत कमीपणा येतो. जे सकाळी नाश्ता करत नाही त्यांचे वजन अधिक असते. नाश्ता न केल्याने शरीरातील हार्मोन्सचे प्रमाण बदलते आणि कोलेस्ट्रॉल वाढते. 


नास्ता (ब्रेकफास्ट)कसा असायला हवा:-
संपूर्ण रात्रभर काहीही न खाल्ल्याने शरीरातील प्रमाण घटत परिणामी सकाळी संतुलित मस्त २४ ते २५ टक्के कॅलरीज असा असावा नाश्त्यामध्ये योग्य प्रकार मात्रेमध्ये कार्बोहायड्रेट्स प्रोटीन तथा फायबरचा समावेश असणे गरजेचे आहे काय कार्बोहायड्रेट मध्ये हिरव्या भाज्या हिरवी फळे यांचा समावेश असणे गरजेचे आहे ते एनर्जी सोबतच फायबर देखील शरीराला पुरवितात पदार्थ जसे दूध अंडी, पनीर वगैरे घेणेदेखील लाभदायक आहे. तळलेला, चरबीयुक्त नाष्टा अशा पदार्थांचा समावेश करू नये. कमी किंवा त्यातून बनवलेले पदार्थ दही, पनीर वगैरे घेता येईल. त्यापेक्षा इडली, डोसा, अंड्याची पोळी, ज्वारी, बाजरी किंवा गव्हाची चपाती दूध, चहाबरोबर किंवा फळांच्या रसाबरोबर घेता येईल. लहान मुलांनाही त्याची सवय करून देणे गरजेचे आहे. त्यामुळेच स्वस्थ जीवनासाठी कोणीतरी खरंच म्हटले आहे की, नाश्ता करावा राजासारखा, दुपारचे जेवण राणीसारखे आणि रात्रीचे भोजन भिकाऱ्यासारखे.






टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.