Ticker

10/recent/ticker-posts

'ठाकरे' म्हणजे साक्षात बाळासाहेब

'ठाकरे' म्हणजे साक्षात बाळासाहेब
-दादासाहेब येंधे(dyendhe@rediffmail.com)

बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवन कहाणीवर 'ठाकरे' हा चित्रपट प्रसिद्ध झाला आहे. हा चित्रपट पाहताना जणू बाळासाहेब ठाकरेच समोर उभे आहेत की काय असे वाटते. सदर चित्रपट दंगलीचे बरेचसे सीन आहेत. केवळ बाळासाहेबांनी सांगितले तर दंगल थांबू शकते याचे चित्रण या चित्रपटात दाखवले गेले आहे. ज्यांनी बाळासाहेबांना पाहिले आहे, अनुभवले आहे त्यांना ही गोष्ट पूर्णतः पटते. कारण, खरोखरच बाळासाहेबांच्या हातात नव्हे तर बोटात दंगल  शमविण्याची ताकत होती कारण त्यांच्यावर लोकांचे प्रेम होते. "जमलेल्या माझ्या, तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो" हे शब्द उच्चारताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आपल्या भाषणाची सुरुवात करीत. या शब्दांनी तब्बल पाच दशके मराठी माणसाच्या मनावर अधिराज्य गाजविले. बाळासाहेब ठाकरे उभे राहिले की, टाळ्यांचा कडकडाट होत असे. त्यांचे भाषण म्हणजे तुफान टोलेबाजी असे. आव्हान, थट्टा, मिमिक्री, शिव्या, धमक्या आणि शब्दांच्या कोट्या यांनी भाषण भरलेले असायचे. या बिनधास्त शब्द शैलीमुळे मराठी माणसाचे रक्त सळसळत असायचे त्यांच्या भाषणाने मराठी माणसाच्या अंगात एक प्रकारे उत्साह संचारत असे. बाळासाहेब ठाकरे जे म्हणतील त्याला साहेबांचा आदेश मानून जे होईल त्याला निधड्या छातीने सामोरे जाण्याची धमक मराठी माणूस ठेवीत होता. मराठी माणूस तात्काळ त्यांच्या आदेशाचे पालन करीत होते. हे या चित्रपटातून दाखवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसासाठी बाळासाहेबांनी जो लढा दिला त्यावर या चित्रपटात चित्रण करण्यात आलेले आहे. बाळासाहेब ठाकरे सारखे कणखर नेतृत्व महाराष्ट्राला लाभले. देशातील राजकारण त्यांच्यामुळे ढवळून निघाले. पाकिस्तानातही हिंदूंचा कैवारी म्हणून बाळासाहेबांचे नाव घेतले जाऊ लागले. महाराष्ट्रातील प्रत्येक माणसासाठी त्यांनी घेतलेले कष्ट केलेला संघर्ष या चित्रपटातून करण्यात आलेला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या

Please do not enter any spam link in the comment box.