Ticker

10/recent/ticker-posts

कोरोनानंतर देशात बरेच काही बदलेल

कोरोनानंतर देशात बरेच काही बदलेल
-दादासाहेब येंधे (dyendhe1979@gmail.com)
काळ सगळं काही बदलून टाकतो, असा फार जुना समज आहे.पण, आपला इतिहास असे सांगतो की, काही घटना जग बदलून टाकतात किंवा जगाला नाईलाजाने का होईना बदलावे लागते. अशा घटना मानवनिर्मित असतात किंवा नैसर्गिक, पण वास्तव असे सांगते की, अशा घटनांनंतर नागरिकांच्या जीवनातील गरजाही बदलून जातात. त्यातूनच काही नव्या गोष्टींचा उदय होतो. जसे की,  २६ /११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर पोलीस दलात अद्ययावत शस्त्रे, बोटी, बुलेट-प्रुफ जॅकेट असे कोट्यवधी रुपयांची खरेदी करण्यात आली जागोजागी सीसीटीव्ही सुद्धा बसविण्यात आले. एचढेच नव्हे तर कित्येक देशांत दहशतवाद्यांनी हल्ले केल्यानंतर विमानतळावर सुरक्षा कडक केली. स्कॅनिंग पद्धतीत मोठे बदल केले गेले. 

असाच काहीसा बदल कोरोना नंतर आपल्या देशात होऊन आपले आयुष्य बदलून टाकेल. आज कोरोना आपत्तीमुळे देशापुढील अनेक  आव्हानांसोबतच अनेक चांगल्या गोष्टी सुद्धा समोर आल्या आहेत. देशात गरजेनुसार आरोग्य सुविधांसाठी आवश्यक अशा समुग्रीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केले जात आहे.  यात सामान्य नागरिकसुद्धा मागे नाही. अनेक नागरिक आपापल्या परीने मास्क, सॅनिटाझर निर्मिती तर काही संशोधन संस्था कोरोना बधितांसाठीच्या चाचणीचे अल्प दरातील यंत्र, पी.पी.ई. किट इत्यादींचे उत्पादन करताना दिसत आहे. भारतातील काही कारण ग्रहांमधील कैदी सुद्धा रात्रंदिवस मास्कचे शिवणकाम करीत आपल्या देशभक्तीचा परिचय देताना दिसत आहेत. अनेक सामाजिक संघटना सरकारी यंत्रणेच्या मदतीशिवाय आणि दीनदुबळ्यांची मदत करण्यात व्यस्त आहेत. एकूणच गरज ही शोधाची जननी म्हटल्यास भारतात अनेक उद्योग कुटिरोद्योग असो की अन्य, सुरू करण्यास उपयुक्त वातावरण निर्माण झाले आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. मेड इन चायना ऐवजी दोन रुपयांनी जरी महाग असले तरी 'मेड इन इंडिया' उत्पादने सामान्य भारतीय खरेदी करण्यास प्राधान्य देतील.

कोरोननानंतर पर्यटन क्षेत्रातही मोठे बदल होतील. लोक गर्दीच्या ठिकाणांना टाळून निसर्ग पर्यटनाला पसंती देतील. देशांतर्गत, त्यातल्या त्यात राज्यातल्या पर्यटनस्थळांकडे पावले वळतील. पर्यटन स्थळांवर अधिक काळजी घेतली जाईल. रिसॉर्टमध्ये निवास, प्रवासाच्या नियमांतही मोठे बदल होतील.

आपण कोरोनाला हरविल्यावर 'हेल्थ अँड हायजिन' हेच आपले सर्वोच्च प्राधान्य असेल. व्यक्तिगत स्वच्छतेला प्राधान्य देण्यात येईल. भविष्यात आपल्या देशात आरोग्यसेवा या चांगल्या प्रतीच्या व सर्वांना परवडतील अशा होतील. सरकारी रुग्णालयांची स्थिती बऱ्याच प्रमाणात सुधारेल. साबण, सॅनिटाझर, मास्क व इतर काही औषधांची मागणी वाढेल. म्हणजे हायजीनवर सर्वात जास्त लक्ष दिले जाईल. लोक योगा, व्यायाम, जॉगिंग, चालणे अशा गोष्टींकडे जास्त प्रमाणत वळतील. शालेय शिक्षण जास्तीत जास्त ऑनलाइन पद्धतीने चालविले जाईल. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या